विजय तोकला
इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा:-प्रदेशाध्यक्ष मा.ना.श्री जयंतराव पाटील साहेब यांनी इंधन दरवाढीच्या विरोधात विशेषतः केंद्र शासनाने ज्या घरगुती ग्यासच्या भरमसाठ किंमती वाढविल्या त्या संदर्भात संपूर्ण राज्यात जिल्हा आणि तालुकाच्या पातडीवर दोन दिवसाच्या आंदोलन करण्याचे आवाहन केलं असता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा.माजी राज्यमंत्री तथा आमदार अहेरी विधानसभा क्षेत्राचे नेते धर्मरावबाबा आत्राम साहेबांचा मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाव्यापी जणआक्रोश आंदोलने
दिवसेंदिवस गॅस व इंधनचे दरवाढ होत असून पेट्रोल-डिझेलचे दर तर उच्चाक गाठले आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोवऱ्यावर चूल पेटवून भाकरी थापून स्वयंपाक बनविले, आणि गॅस, इंधन दरवाढ व महागाई वारंवार भडका घेत असल्याने केंद्र शासनाच्या विरोधात निषेध नोंदवून संताप व्यक्त केले.
उल्लेखनीय म्हणजे गत आठ महिन्यांपासून वारंवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षातर्फे गॅस, इंधन, पेट्रोल-डिझेल व केंद्र शासनाशी निगडित असलेल्या तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात चूल पेटवून आंदोलन छेडण्यात आले आहे.
केंद्र व मोदी सरकार तात्काळ गॅस व इंधनाचे दरवाढ कमी न केल्यास अजून मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिले.
केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंना महाग करून नागरिकांची गळचेपी करीत असून गॅस, इंधन दरवाढीमुळे घरगुती अर्थसंकल्प कोलमडत आहे गॅस, इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात केंद्र शासन व मोदी सरकारच्या विरोधात या आधी अनेकदा जिल्हाभर चूल पेटवा आंदोलन करण्यात आले.
महागाईच्या विरोधात पुढे महिला उग्र रूप धारण केले तर देशाची व राज्याची परिस्थिती बिघडून जाईल त्यामुळे केंद्र सरकारने संतापाचा अंत पाहण्यापेक्षा तात्काळ याची दखल घेऊन गॅस, इंधन, पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढ कमी करावे अशी तीव्र व एकमुखी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर व राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांनी केले आहे.