गोंडपीपरी: पुस्तकासाठी जीव धोक्यात घालणारे आणि पुस्तकासाठी घर बांधणारे जगातील एकमेव महान व्यक्तिमत्त्व विश्वरत्न, राष्ट्रनिर्माते, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर येथे हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रबोधन विचार युवा मंच तर्फे शालेय साहित्य वाटप आणि करियर मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला.
महापरिनिर्वाण दिनी सुरज दहागावकर याने नागवंशीय बुद्धविहारात विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांना शालेय सहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी युवा संयोजक प्रणित उराडे यांनी आयुष्यात आपली संगत कशी महत्वाची आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच रितीक खोब्रागडे यांनी मॉन्टी रॉबर्ट यांची प्रेरणादायी स्टोरी सांगून विद्यार्थ्यांना स्वप्नांचा पाठलाग करायला सांगितले. सोबतच संकेत वेल्हेकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
प्रबोधन विचार युवा मंच चे मुख्य संयोजक विनोद सोनटक्के यांनी पुस्तकाचे महत्व सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात घडलेला एक खिसा सांगून उपस्थित लोकांना सांगितला.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार चांदणी अलोने यांनी तर प्रास्ताविक सुरज दहागावकर यांनी केलं. यावेळी मयुर पाटील, धनंजय पिंपळे, भारतीय बौद्ध महासभा चेकबापूर चे अध्यक्ष देवानंद मुंजनकर, सचिव राजेश झाडे,माजी सरपंच फुलबाई शेरके, नामदेव शेरके, जीवन अलोने तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी,पालक तसेच समाजबांधव उपस्थित होते..
प्रबोधन विचार युवा मंच तर्फे सकमुर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप आणि करियर मार्गदर्शन….
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements