नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा संपादक)
गडचिरोली – गडचिरोली जिल्हा सोबत चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील लागून असलेल्या परिसरात 13 लोकांचा बळी घेऊन ज्या नरभक्षक वाघाचा हाहाःकार होता अखेर त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. मागील आठवडा पासून वनविभागाच्या 2 टीम त्याच्या मागावर होत्या, आज दिनांक १३ऑक्टोबर ला सकाळी झालेल्या कारवाईने विभागातल्या नागरिकांना तसेच वनविभागाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
या वाघाने देसाईगंज विभागात वालुमाता भागात दोन दिवसा अगोदर एका गायीच शिकार केला होता, त्यामुळे तो पुन्हा त्या एरिया मध्ये वापस येणार याची खात्री ठेवून ताडोबा येथून आलेली टीम त्याच्या वर पाळत ठेवून होती, अखेर आज सकाळी सिटी -१ वाघ त्यांच्या जाळ्यात सापडला आणि टीम ने बेशुद्धइचे इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद केले आणि त्याला आतात्या वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाणार आहे अशी माहिती वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी दिली.