मासिक पाळी पुरक समाज निर्मिती व्हावी. मासिक पाळीविषयी समाजात असलेले गैरसमज, अंधश्रद्धा दूर व्हव्यात व त्या काळात महिलांची आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी समाजबंध 2016 पासून आदिवासी तसेच ग्रामिण भागात प्रबोधनाचे काम करित आहे. समाजबंधच्या सत्याचे प्रयोग उपक्रमातून प्रेरणा घेवून महाराष्ट्रात विविध भागात समाजबंधचे स्वयंसेवक मासिक पाळी व महिला आरोग्यावर आधारित संवाद सत्र मार्गदर्शन करित आहेत.
28 मे जागतीक मासिक पाळी दिनाचेऔचित्य साधून यशवंत ग्रामपंचायत कोंढाळा येथे नाविन्यपूर्ण स्पर्धा व मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात झाले होते. यावेळी समाजबंध चे स्वयंसेवक रोहित सोनटक्के व प्रगती चुनारकर यांनी मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, स्वच्छता आहार मासिक पाळीचे प पाळीचा या विषयावर मार्गदर्शन केले.
समाज बंध निर्मित पर्यावरण पूरक आशा पॅड, मेन्स्ट्रकूल कप विषयी माहिती दिली. त्यासोबतच सत्याचे प्रयोगातील अनुभव कथन केले। बेखौफ जिना है मुझे आझाद होके यावर मयुरी आत्राम यांनी मार्गदर्शन केले. तसेच रोशनी पारधी, सरपंच अपर्णा राउत व डॉ. अश्विनी कुथे मासिक पाळीकडे सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे हे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोंढा ळा येथिल सरपंच अपर्णा राउत होत्या. उद्घाटक म्हणून जि.प. माजी सभापती रोशनी पारधी उपस्थित होत्या. ग्रा.प. सदस्य शेषराव नागमोती, KEF Fellowship संदिप साबळे, कुणाल दादा, सामाजिक कार्यात आवड असणारे चेतन सोनुले, जितेंद्र सहारे उपस्थित होते.