बळीराम काळे/जिवती
जिवती: तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी,वयोवृद्ध, महिला व पुरुष यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिवती तालुक्याची निर्मिती जुलै 2002 मध्ये झाली.20 ते 21 वर्षे पूर्ण होऊनही तहसील कार्यालय च्या आवारात मुद्रांक विक्रेता व अर्जनविस ईमारत बांधकाम नाही.तालुक्यातील ८३ गावाचा समावेश असून ८३ गावातील वयोवृद्ध महिला व पुरुष,विद्यार्थी आणि शेतकरी तहसील कार्यालयात शासकीय तसेच वैक्तिक कामकाजासाठी येत असतात,परंतु त्यांना ऊन आणि पाऊस यापासून सामना करावा लागतो.
व ऊन पाऊस यापासून बचाव करण्यास तहसील कार्यालयाच्या आवारात सादी व्यवस्था नाही.
तहसील कार्यालयच्या आवारात मुद्रांक विक्री व अर्जनविस भवनांची नितांत आवश्यकता आहे.
तहसील कार्यालय जिवतीचे बांधकाम मौजा जिवती येथील नागोराव मारू कन्नाके व इतर यांच्या भूमापन क्रमांक ९/१० मध्ये केलेले आहे. व तहसील कार्यालय जीवतीच्या ०.८० हे.आर जागेत मुद्रांक विक्रेता /अर्जनविस भवन बांधकाम करण्याकरिता १०० चौ.मीटर जागा उपलब्ध असल्याचे तलाठी सांजा
क्रं.१ जिवती तलाठी यांचे प्रमाणपत्र,स्थळदर्शक नकाशा,जागेचा सात-बारा (७/१२)यासह
दत्ता शिवाजी जाधव मुद्रांक विक्रेता जिवती यांनी प्रस्ताव सबंधित विभागाकडे सादर केलेला आहे.
परंतु याकडे सबंधित विभाग कानाडोळा करीत आहे.सध्या उन्हाळा संपुष्टात आलेला आहे, तरीपण नागरिक उन्हाचा चटका सहन करीत तहसील चे कामे करून घेतांना दिसत आहे.अर्जनविस भवन नसल्याने मुद्रांक विक्रेता,अर्जनविस हे तहसील कार्यालय जीवतीच्या आवारात उघड्यावर बसून आपली सेवा देत आहे.
परंतु पावसाळा सुरू झाल्यावर करायचे काय;