चंद्रपूर
आपल्या दुचाकीने गावाकडे निघालेल्या पती-पत्नीवर काळ टपला होता. धावत्या दूचाकीवर विज कोसळली. यात पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दूदैवी घटना ब्रम्हपुरी तालुक्यात घडली आहे.
पारडगाव निवासी पिंटू मोतीराम राऊत 32 यांचे दोन वर्षी पूर्वी ठेंगरी यांचे मुलीशी लग्न झाले होते व त्यांना सध्या दीड वर्षाचा मुलगा आहे.
पिंटू राऊत यांची भिवंडी ला नोकरी होती.
पत्नी ही दिड वर्षाच्या लहान मुलगा व सासू सोबत पारडगाव ला राहत होती. नुकताच लॉक डाऊन संपल्यानंतर पिंटू काही दिवसाच्या सुटीवर गावी परत आला होता.
एक दोन दिवसात परत नोकरीवर भिवंडी ला जायचे असल्याने आज दि 18 ला दुपारी 3 च्या सुमारास पिंटू हा पत्नी गुंजन 27 सह ब्रम्हपुरी ला काही कामानिमित्त दुचाकीने आला होता. याच दरम्यान वीज गर्जनेसह पावसाने सुरवात केली.।घरी लहान मुलं असल्याने ते दोघेही पावसातच दुचाकीने परत निघाले. पारडगावी परत जात असताना उदापुर जवळील अंजली राईस मिल जवळ येताच प्रचंड ढगांचा आवाज होऊन वीज त्यांचे दुचाकीवर पडली. अचानक झालेल्या अपघातात दोघेही पती पत्नी यांचा घटनास्थळी च मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ वेक्त केली जात आहे.