धानाच्या शेतीतच वनविभागाने लावली झाडे, शेतकऱ्याची झाली आहे मोठे नुकसान

573

 

कुरखेडा प्रतिनिधी/रमेश कोरचा

तालुका मुख्यालयापासुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मालदुगी येथील रमेश नैताम यांच्या शेतावर वनविभागाने उभ्या पिकावर झाडे लावली आहेत. हे काम कुरखेडा वनपरिक्षेत्र अंतर्गत गोठणगांव वनविभागाने केलेली आहे. यामध्ये शेतकऱ्याचा अतोनात नुकसान झाले आहे.
ही जमीन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करिता रमेश नैताम यांनी सन2003 पासून जोत करत होता. या जमिनीचा इ-पंजी रेकॉर्ड देखील आहे. याआधारे स्थाई पट्ट्या करिता सदर जमिनीचा वन हक्काची दावा सक्षम प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे.
तसेच सदरील क्षेत्र पेसा कायद्यात येत आहे. असे असताना गोठणगाव वनविभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने उभ्या पिकावर झाडे लावली आहेत. यांनी शेतकऱ्याचा नुकसान तर केलाच परंतु पेसा कायद्याच्याही उल्लंघन केलं आहे. तेव्हा वरिष्ठांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.