गोंडपिपरी:- जिल्हा नियोजन भवन चंद्रपूर येथे शेतकऱ्यांच्या समस्या, पिक कर्ज याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावर यांनी तालुक्यतील समस्यांच्या पूर्ततेसाठी उपस्थिती दर्शवली.गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रामुख्याने मांडल्या. भंगाराम तळोधी येथिल बैंक ऑफ इंडियाच्या शाखे मध्ये २४ फेब्रुवारी पासुन बँक व्यवस्थापक (मैनेजर) नसल्याने येथील शेतकऱ्यांचे पिक कर्ज, बचत गटाचे आर्थिक व्यवहार, दुकानदारांचे सीसी लोनसह EKYC नेकाम मागील पाच महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.
हा प्रकार पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांच्या लक्षात आणुन दिला आणी यावर जलद गतीने तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली. तसेच तालुक्यातील अनेक समस्यांचा पाढा ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर वाचला, त्या लवकरात लवकर सोडविण्यात यावे अशी विनंती केली. महत्वाचे म्हणजे गावातील बँकेत गेल्या कित्येक महिन्यांपासून व्यवस्थापक नसल्याने तेथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेती संबंधी योजनांचे प्रकरण प्रलंबित राहत आहेत. बँकेत व्यवस्थापक नसल्याने व्यवहार ठप्प व बचत गटांना आर्थिक व्यवहारात चांगलाच फटका बसत आहे. आता – शाळकरी विद्यार्थांना शिष्यवृत्तीसाठी देखील फटफजिती होणार आहे.
त्यासाठी येत्या सात दिवसाच्या आत नवीन बँक व्यवस्थापकाची भरती करून शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच २०२३ २४ मध्ये झालेल्या अती वृष्टीचे रखडलेले अनुदान, शेतकऱ्यांचा पीक विमा मिळवून द्यावे असे निवेदनार्थ मागणी केली. बोडलावारांची जनतेप्रती असलेली तळमळता पालकमंत्र्यांनी जाणुन घेतली आणि समितीत उपस्थित केलेल्या लोकाभिमुख मागण्यांने लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी मारोती अम्मावार माजी उपसरपंच भं. तळोधी उपस्थित होते.