सेंद्रीय शेती  काळाची गरज चकपिरंजी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न

350

सावली: डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक मिशन सन 2024-25 अंतर्गत साईश्रेया फार्मर प्रो कंपनी चकपिरंजी अंतर्गत दोन गटाचे गावपातळीवरील शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्रीती हिरळकर प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर, श्री पानसे मंडळ कृषी अधिकारी सावली,सौ अल्का स्वामी सी इ ओ साईश्रेया फार्मर प्रो क चकपिरंजी ,श्री अनिल स्वामी संचालक साईश्रेया फार्मर प्रो क चकपिरंजी, श्री फुलझेले व्यवस्थापक महाबीज हे प्रामुख्याने उपस्थित होते .सदर कार्यक्रमात सेंद्रिय शेती हे काळाची गरज असून भविष्यात आपल्याला सेंद्रीय खताचा आणि सुपीक जमिनीचा किती लाभ होणार आहे याचे महत्व सांगून प्रात्यक्षिक 10 ड्रम थेरी चे वापर करून शेतकरी यांनी सेंद्रिय शेती करायला पाहिजे असे प्रतिपादन प्रकल्प संचालक चंद्रपूर यांनी केले श्री पानसे यांनी केले.तर प्रात्यक्षिक दशपर्णी, जीवाअमृत, बिजामृत तसेच 10 ड्रम थेरी बाबत माहिती सांगण्यात आले.त्या नंतर मेटाराईझम या बाबत श्री हताझाडे यांनी प्रात्याक्षिक करून दाखविले तसेच सदर कार्यक्रमात जैविक निविष्ठा केंद्र,गट व कंपनी स्थापने याबाबत माहिती, माती परीक्षण,PDNSM योजना बाबत माहिती श्री कावळे बीटीएम यांनी समजावून सांगितले.