जिवती (ता. प्र.)जगासह देशात मणिपूर येथील सवंदेनशिल घटनेविषयी आक्रोश व्यक्त होत असताना आदिवाीबहुल भाग असलेल्या जिवती तालुक्यातील आंभेझरी गावातील एका १९ वर्षीय आदिवासी कोलाम समाजातील मतिमंद मुलीवर ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत अतिप्रसंग केल्याची अत्यंत निंदनीय घटना घडली.या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ मूलनिवासी एकता संघर्ष समिती,कोलाम संघटना,गोंडवाना गणतंत्र पार्टी तसेच विवध सामजिक व राजकीय संघटनांच्या वतीने शकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
जनआक्रोश मोर्चा वीर बाबुराव शेडमाके चौकातून मुख्य मार्गाने तहसीलवर धडकला.आंभेझरी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.आंबेझरी व मणिपूर प्रकरणातील आरोपीला फासीची शिक्षा झाली पाहिजे.आणि पीडितांना संरक्षण द्यावे व यापुढे महिलांवर अत्याचार होणार नाही,यासाठी कठोर कायदा करावा,या मागणीचे निवेदन सादर तहसीलदार जिवती यांच्या मार्फत रास्ट्रपती,राज्यपाल,अध्यक्ष,राष्ट्रीय अनु.जमाती आयोग,मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सादर करण्यात आले.
यावेळी भीमराव पाटील मडावी,गजानन पाटील जुमनाके,प्रा.लक्ष्मण मंगाम, कंटू कोटनाके,सतलबी जुमनाके
,विमल कोडापे,पांडुरंग जाधव ईत्याडी उपस्थित होते.