Homeचंद्रपूरखारघर घटनेतील मृतक कुटुंबात सरकारी नोकरीसह एक कोटी रुपये अर्थसहाय्य करा :...

खारघर घटनेतील मृतक कुटुंबात सरकारी नोकरीसह एक कोटी रुपये अर्थसहाय्य करा : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : खारघर येथे दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जवळपास ६०-७० श्रीसदस्यांचा कडक उन्हात बसल्याने मृत्यू झाला. हि घटना अतिशय गंभीर व वेदनादायक आहे.

या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात राज्य सरकारच्या तिजोरीतून सुमारे १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र राज्यभरातून उपस्थित झालेल्या लाखो श्रीसदस्यांसाठी मंडप, पंखे, पिण्याचे पाणी या सोयी देखील उपलब्ध नसल्याने कडक उन्हात तासनतास बसल्याने उष्माघाताने गुदमरून तसेच चेंगराचेंगरी होऊन अनेक श्री सदस्यांचे मृत्यू होऊन त्यांचे कुटूंबीय उध्वस्त झाले.

राज्य सरकारच्या नियोजन शुन्यतेमुळे मोठ्या प्रमाणात जीव गेले व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मंत्रालयाने घेऊन मृतक कुटुंबांना सरकारी नौकरी व एक करोड रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना केली आहे.

सरकारी कार्यक्रमात मृत्यू झाल्यास पंजाब व दिल्लीतील आप सरकार एक कोटी रुपये मृतक कुटुंबांस देते त्यांचं धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील त्वरित मदत करावी अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!