प्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)
अहेरी :- येथील गडअहेरी गावात दोन दिवसात पिण्याचे पाणी न सोडल्यास आपल्या कार्यालया समोर पाण्याचे हंडे-पालथे घेवून ठिया आंदोलण करणार असल्याचे निवेदन गडअहेरी वासियांनी ग्रामीण पाणी पुरवठाचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून ठिय्या आंदोलन करण्याच्या इशारा दिले आहे. गडअहेरी हे जवळपास दोनशे वस्तीच गाव आहे. सार्वजनिक नळ बंद झाल्याने गावातील जवळपास सर्वज नागरिकांच्या घरी खासगी नळ जोडणी केलेली आहे.
गावात दोन हातपंप असून त्यामधील एक बंद पडलेला आहे. हातपंपाचे खोदकाम केल्यास हातपंपाला सुध्दा पाणी लागत नाही. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव साधन म्हणजे आपल्या कार्यालयामार्फत नळाद्वारे सोडण्यात येणारे पिण्याचे पाणी आहे.जवळपास पाच ते सहा वर्षापासून गडअहेरी या गावाला तसेच चेरपल्ली, गुप्पा, कोत्तुर, चिंचगुंडी वांगेपल्ली, भुजंगरावपेठा खमनचेरू, वांगेपल्ली कॉलनी अशा 10 गावांना ग्रामिण पाणी पुरवठा च्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. महिण्यातून दहा दिवस नियमित पिण्याचे पाणी सोडल्यानंतर विस दिवस तांत्रिक बिघाडीचे कारण सांगून किंवा इतर कारण सांगून नारिकांना आळाटाळ करणे सुरू आहे.
आता मागील तिन-चार महिण्यासापासून दोन-चार दिवस नियमित पिण्याचे पाणी सोडल्यानंतर तांत्रिक बिघाडीचे तसेच पाण्याची टाकी स्वच्छ करीत असल्याचे कारण सांगून पिण्याचे पाणी सोडणे बंद केले. त्यामुळे गावातील नागरिकांना दिड ते दोन कि.मी. वरून पाणी आणावे लागत आहे. तसेच आताही दहा ते बारा दिवसापासून पिण्याचे पाणीचे पुरवठा करणे बंद केलेले आहे. कार्यालयात फोनद्वारे माहिती घेण्यास फोन केल्यास कार्यालयातील अधिकारी फोन स्विकारत नाही तसेच कुठलाही प्रतिसाद देत नाही. ग्रामिण पाणी पुरवठा कर्यालय, अहेरी कार्यालयात तिन चार वेळ भेट दिल्यानंतर असे कळले की, पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी कंत्राटदार यांना मागील काही महिण्याचे देय रक्कम मिळाले नसल्याने सदर गावांना पाणी पुरवठा करणे बंद केला. उपरोक्त गावातील
नागरिक हे ग्रामिण पाणी पुरवठा कर्यालय, अहेरी येथे नियतिमत पाणी कर भरणा करीत आहेत . पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकून नाहक त्रास सहन करावे लागत आहे. आहे. तरी सुध्दा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे वरील गावातील नागरिकांना पिण्याच्या पाणी उपलब्द नाही. गडअहेरी गावात जर दोन दिवसात पिण्याचे पाणी न सोडल्यास ग्रामिण पाणी पुरवठा कार्यालय, अहेरी च्या समोर नाईलाजास्तव पाण्याचे हंडे-पालथे घेवून ठिया आंदोलण करण्यात येईल अशा इशारा गडअहेरी येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता यांच्या मार्फ़त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे दिलेल्या निवेदनात म्हट्ले आहे, यावेळी राहुल दुर्गे, राकेश वाघाडे, ऍड पंकज दहागावकर, अक्षय आत्राम, रोहित राऊत, अनुराग मेकला, आकाश हवसे, अमोल राऊत, प्रीतम आत्राम, राकेश येदुलवार, अक्षय ओंडरे, कुणाल मेश्राम आणि आकाश इनाम आदी उपस्थित होते.