Homeचंद्रपूरराष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

चंद्रपूर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) राजेंद्र वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असतानाच वैद्य यांचे राजीनामा नाट्य घडले . त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहे . एका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत वैद्य यांना विश्वासात घेतले नाही . त्यामुळे ते दुखावले . याच नाराजीतून त्यांनी जिल्हाध्यक्षपद सोडल्याची चर्चा आहे .

मूळचे काँग्रेसचे वैद्य यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला . पक्षाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांना लवकरच जिल्हाध्यक्षपद देण्यात आले . सन २०१४ पर्यंत ते या पदावर कायम होते . त्यानंतर संदीप गड्डमवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची ( ग्रामीण ) धुरा आली . २०१ ९ च्या विधानसभा निवडणुकीत गड्डमवार शिवसेनेत गेले . त्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून वैद्य यांच्यावरच पक्षनेतृत्वाने विश्वास दाखविला . तेव्हापासून आजतागायत वैद्य या पदावर कायम आहेत . या काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी वैद्य यांची चांगलीच जवळीक निर्माण झाली.राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार , खासदार सुप्रिया सुळे , विरोधी पक्षनेते अजित पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मागील सहा महिन्यांत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येवून गेले .पक्ष वाढीसाठी वैद्य यांनी सातत्याने प्रयत्न केला. परंतु पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण थांबवण्यात त्यांना अपयश आले.अश्यात एका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना वैद्य यांना विश्वासात घेतल्या गेले नाही.त्यामूळे ते नाराज होते.यातूनच राजीनामा दिल्या गेल्याची चर्चा आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!