प्रलय म्हशाखेत्री
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर: हे नावाजलेले औद्योगिक शहर म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. शहरात अनेक मान्यवर रेल्वे ने येणं जाणं करतात. पंरतु चंद्रपुरातील रेल्वे स्थानकावर पाण्याची कमतरता आहे, स्थानकावर पाण्याचे ठिकाण भरपूर आहेत. परंतु त्याला पाणी मात्र नाही. पिण्याचे पाणी नसल्याने प्रवाश्यांचे अनेक हाल होतं आहेत. सगळ्यांना बिसलेरी पाणी घेणं जमत नाही म्हणून लवकरात लवकर याची सोडवणूक व्हावी असे प्रवाशी म्हणत होते.