ब्युरोचिफ प्रशांत शाहा
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथून १२ किमी अंतरावर मूलचेरा तालुक्यात येत असणारा गरंजी हे गाव आहे
परिसरातील अतिदुर्गम आदिवासी गावामधून या गावाची विकासाकडे वाटचाल दिसतो. परंतु गरंजी या गावाला जाणारा मुख्य मार्गावरती एका तुटलेल्या पुलावरून प्रवास करावा लागतो.
एकीकडे देश स्वतंत्रचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. आणि इकडे गरंजी वासीयांना अमृत मात्र मिळेना अस झाला आहे.मागील वर्षभरापासून गरंजी गावकऱ्यांनी शासनाकडे तीन ते चारदा या पुलाची निर्मिती करण्यात यावी या करिता निवेदन दिले.परंतु अजूनही याकडे कोणतेच वरीष्ठ अधिकारी लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे.
अखेर कोणताच उपाय नसल्याने गावकऱ्यांनी स्वतःच या फुटलेल्या पुलाचे दगड टाकून तात्पुरता ये-जा करण्याकरिता मार्ग बनविला आहे.या वेळी गरंजी येथील लालाजी हिचामी,बाजीराव हिचामी,संजय हिचामी,सन्याशी हिचामी,कोतु हिचामी,तुळशीराम नरोटे,मधुकर कांदो,लकी हिचामी,तुकाराम कंगाली,भाऊजी पोटावी व गावातील संपूर्ण नागरिक उपस्थित होते.शासनाने या कडे लक्ष देऊन त्वरित या पुलाची मंजुरी करून नवीन पूल बांधवा अशी मांगनी गरंजी येथील नागरीकांनी केली आहे