-श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)
चंद्रपूर..स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर येथील आकाश क्षीरसागर याला दारू सारख्या महाभयानक आजाराने ग्रासले होते. त्यातच त्याला दारू ने ऐवढे झपाटले होते की त्याला वेळोवेळी दारूची गरज भासत असे. सूत्रानुसार असे कळले की, बहिणीला भेटायला जातो म्हणून त्याचे वडील व मयत हे दोघेही कोल्हापूर ला जायला निघाले. वाटेत त्याला दारू पिण्याची इच्छा निर्माण झाली.
आपली इच्छा त्याने सोबत असलेल्या वडिलांना सांगितली व वडिलांनी त्याला होकार दिला. परंतु त्याच्या मनात खदखत असलेले विचार त्याच्या वडिलांना कळले सुद्धा नाही. दारू पिल्या नंतर तो वडीलांपासून दूर झाला वडिलांनी शोधाशोध केली परंतु तो मिळाला नाही.
शेवटी पोलीस तक्रार केली व त्याच्या मनात होते तेच केले. त्याने एका शेततळ्यात जाऊन आत्महत्या केली. शेवटी चार ते पाच दिवसांनी त्या शेततळ्यात त्याचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळाले. त्याच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
एकीकडे सरकार म्हणते की, युवा पिढी आमच्या देशाचं भवितव्य आहे आणि असेच युवा जर दारू सारख्या महाभयानक आजाराने ग्रस्त होऊन आपली जीवन यात्रा संपवत असेल तर भारतासारख्या देशाला लागलेले दुर्भाग्य आहे. हा खूप मोठा प्रश्न पडतो आहे..एक तर ह्या साऱ्या गोष्टीवर उपाय शोधावे किंवा दारुलाच हद्दपार करावे. कारण अनेक संसार ह्या दारूमुळे रोज उद्ध्वस्त होत असते.