एटापल्ली :- पंदेवाही(म.) मौजा पुनागुडा येथील विज पुरवठा तिन ते चार महिन्यापासून खंडित आहे तसेच सण २०१४ पासून विज मिटर साठी डिमांड भरून सुद्धा त्या नागरिकांना विज मिटर देण्यात आले नाही आणि ज्यांचा कडे मिटर आहेत त्यांच्या कडे तिन ते चार महिन्यापासून विज पुरवठा खंडित आहे. तेथील नागरिकांनी वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क करून सुद्धा त्यांना प्रतिसाद दिले नाही या प्रकरणाची दखल घेत आज राजमुद्रा फाउंडेशन तर्फे मा.उपअभियंता महावितरण कंपनी लि. कार्यालय एटापल्ली येथे निवेदन देऊन चर्चा केली असता येत्या दोन-तिन दिवसात विज पुरवठा सुरळीत करू असे ग्वाही दिले.
याप्रसंगी अनिकेत मामीडवार राजमुद्रा फाउंडेशन अध्यक्ष, राघव सुलवावार बांधकाम सभापती न.पं. एटापल्ली, मनीष ढाली उपाध्यक्ष राजमुद्रा फाउंडेशन, दिवाकर तलांडे पुनागुडा गावचे पाटील, वासुदेव घोष, तिरुपती चापले, प्रसंजीत करमरकर, वाजीद शेख, संकेत पुल्लूरवार, आशिष बक्षी, दमण मेडीवार, अमित सोनी तसेच पुनागुडा गावातील नागरिक प्रभाकर मडावी, प्रकाश मडावी, ईश्वर सोयाम, सुरज सोयाम, चंद्रा तलांडे, बिचू तलांडे, रुपेश सोया