सिद्धार्थ दहागावकर (प्रतिनिधी)
ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ चंद्रपुर चे सहसंचालक सौरभ मादासवार व अशोक अंबागडे यांनी मुंबई येथील शासकीय वर्षा निवासस्थानी मुख्यमंञ्याना निवेदन देऊन कळविले की,आज राज्यात सँनिटरी पँड चा जास्तीत जास्त वापर होत असुन आजही आदीवासी बहुल भागामध्ये सँनिटरी पँड चा वापर होणे हे प्रत्येक गृहिणींना महाग पडत आहे.करिता आपल्या जुन्या रूढी परंपरेनुसार कापड किंवा इतर वस्तुंचा वापर केल्या जात आहे.
सँनिटरी पँड हे गृहिणींकरीता आरोग्यदायी असुन याचा शंभर टक्के वापर होणे गरजेचे आहे.आज मासिक पाळीमध्ये गृहिणींना असह्य ञास सहन करावा लागतो.कित्येकदा पोटातील विकारांना सामोरे जावे लागते.
करिता राज्यातील शेवटच्या टोकांपर्यंत सँनिटरी पँड उपलब्ध होणे व त्याच्या किंमती कमी होणे गरजेचे आहे असे झाल्यास सँनिटरी पँडचा शंभर टक्के वापर होईल व मासिक पाळीमध्ये निर्माण होणाऱ्या रोगांपासुन मुक्तता मिळेल.करिता मा.मुख्यमंञी साहेब यांनी जातीने लक्ष घालुन सँनिटरी पँड ला जिवनावश्यक वस्तुचा दर्जा देऊन करमुक्त करावे अशी ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ चंद्रपुर च्या वतीने विनंती करण्यात आली.