नितेश खडसे जिल्हा संपादक गडचिरोली
गडचिरोली:- शहरातील चामोर्शी रोडला NHAI चे काम चालू असलेल्या रोड आणि नालीच्या बांधकामामुळे नागरिकांना सतत मागील एक वर्षापासून सहन करावा लागत आहे. त्रास, कुठे ट्राफिक जॅम होतो तर कुठे पिण्याच्या पाण्याची टंचाई, कुठे वीजपुरवठा खंडित होतो.
संपूर्ण उन्हाळा गेला पण कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली नाही आणि ऐन पावसाळ्यात काम चालू केल्याने नागरिकांना अनेक समस्यांना करावा लागत आहे सामना.
कुठे माती पडून आहे, कुठे गड्डे खोदून आहेत,रस्त्याचे एक साईड चे काम झाल्याने त्याच साईड ने गाड्यांचे अवागमन चालू आहे तसे असून कंत्राटदारांच्या एकदम निकृष्ट नियोजन च उदाहरण म्हणजे त्याच साईड ने नाली चे काम चालू केलेलं आहे आणि खोदलेली माती रोड वर सर्वत्र पसरलेली आहे.
कोण देणार लक्ष या नागरिकांच्या समस्यावरती? हायवे रोड च्या कंत्राटदारावर कुणाचाच दवाब नाही तो आपल्या मनमानी काम करत असल्याने हे सगळे प्रकार घडत आहे. एकंदरीत समजून येत आहे की चामोर्शी रोड NHAI च्या कंत्रातदार च्या कामासमोर गडचिरोली चे शासन आणि प्रशासन हतबल झाले असल्याचे चित्र आहे..