गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक
येथील कवी ,साहित्यिक उद्धव नारनवरे यांनी दुर्मिळ ग्रंथांचा आधार घेऊन अयोध्या नगरी ही सम्राट अशोक यांच्या काळातील साकेत नगरी कशी होती हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या अभ्यासातून केला आहे .
गोंडपिपरीतील उद्धव नारनवरे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे .त्यांच्या जीवनखात्यावर दोन पुस्तकांची नोंद आहे .त्यांनी अनेक दुर्मिळ ग्रंथांचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की ,आताची जी अयोध्या नगरी आहे ती साकेत नगरी होती .तेव्हाच्या काळात देशात व्यापारासाठी जी सहा महानगरे होती त्यात साकेत चा समावेश होता .अत्यंत महत्वपूर्ण हे स्थान होते .
हा मुद्दा मांडतांना नारनवरे सरांनी अनेक ग्रंथ प्रस्तुत प्रतिनिधीला दाखवले. सरांचा हा प्रयत्न स्तुत्य आहे…