जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा व एकमेव असलेल्या कर्मवीर कन्नमवार जलाशय(दीना धरण) रेगडी या जलाशयाचे कालव्यातून चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील शेतांना पाणी मिळत असतो. परंतु 1972 साली बनलेल्या या जलाशयाचे कालव्याची देख रेख होत नसून अनेक ठिकाणी कालवा फुटून अनेक पाणी व्यर्थ जात असल्याचे चित्र समोर येत आहे.तरी संबंधित अधिकारी या ठिकाणी या कालव्याची दुरुस्ती करावी अशी मागणी चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवाकडून केली जात आहे.
या जलाशयातील बांधावरील अनेक सेप्टि पिल्लर उखडलेले आहेत. कालव्याजवळून गेलेल्या पायरीची पण दुर्धवस्था झालेली असून यामुळे पर्यटकाला जीवित हानी होण्याची शक्यता नाकारली जात नाही.
दररोज सुमारे तीन ते चारशे पर्यटक रेगडी या जलाशयाला भेट देत आहेत. तरी संबधीत अधिकारी या जलाशयाच्या सोइ सुविधाकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे.