गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम
जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सेमाना पर्यटनस्थळ कडे जाणारा मार्ग सद्यस्थितीत प्रवासी वाहनचालकासाठी तरी मृत्यूचा सापळाच बनलेला आहे.ह्याच मार्गाच्या वळणावर संजीवनी विद्यालय तथा निवासी शासकीय इंग्रजीशाळा आणी पुढे ह्याच परिसरात आनंदानगर वसाहत आहे.सध्या कोरोना च्या पाश्वभूमीवर विद्यार्थ्यांची वर्दळ कमी असली तरदेखील,या मार्गावरून कॉम्प्लेक्स ला असणारे सर्व शासकीय कार्यालये लागून असल्यामुळे बहुतांश अनेक प्रवासी ह्याच मार्गाच्या वळणावरून प्रवास करताना कायम दिसतात.संपूर्ण मार्गावर मोठ्ठाले खड्डे पडलेले असून गिट्टी बाहेर निघाल्याने या रस्त्यांनी प्रवास करताना खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नांत दुचाकी तथा चारचाकी वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.न्यायालया लगत पुढील बायपास ते सेमाना मार्गावर रस्ता पुर्णपणे खड्डेमय असून या रस्त्यानी प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ह्या मार्गावरून जड वाहने जाण्यास सक्त मनाई असल्याचं सूचना फलक लावून ही मोठ्या प्रमाणात दररोज जड वाहतूकही होत असते.हा बायपास मार्ग दर दोन- तीन महिन्यांनी लाखो रुपये खर्च करुन रस्त्याची थातुरमातुर दुरुस्ती केली जाते.परंतु लवकरच या रस्त्याची स्थिती जैसे थे होत असते. याकडे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याची स्पष्ट जानवते आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर रस्ता दुरस्तीकडे शासनाने लक्ष देऊन कोर्ट बायपास ते सेमाना रस्त्याचे बांधकाम त्वरीत सुरु करावे.या मार्गावर वाहनाची वर्दळ मोठ्ठी असते,दोन दिवसापूर्वी याच मार्गावर एका दुचाकी स्वाराचं खड्डे चुकवितांना अपघात झाला. सुदैवाने वाहनांवर नियंत्रण मिळवल्याने किरकोळ दुखापत झाली. दररोज अपघाताच्या घटना घटत असताना सुध्दा,खड्डे दुरस्तीकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.