कुलथ्यातील शेतकरी संतापले आंदोलनाचा इशारा
अरूण बोरकर / धाबा
मागच्या वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळ गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथील शेकडो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले.प्रशासनाने पंचनामे केले.पण वर्ष लोटूनही कुठलीच मदत मिळली नाही.यावर्षी देखील महापुराने कुलथ्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले.मागील वर्षाच्या नुकसानीची भरपाई न मिळल्याने
शेतकरी प्रचंड संतापले आहेत.या शेतकऱ्यांना तातडीन नुकसानभरपाई द्यावी अन्यथा तिव्र आःदोलन करण्यात येईल असा इशारा पंचायत समितीचे माजी उपसभापती मनीष वासमवार यांनी दिला आहे.यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सुपुर्द करण्यात आले.
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा या गावाला नदीपात्राने वेळले आहे.गावातील सर्व नागरिक शेतीवरच आपली उपजिवीका करतात.मागील प्रचंड परिश्रम घेत शेतकरी बांधवांनी पिक फुलवल.पण अचानक आलेल्या अतिवृष्टीन कुलथा गावातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली.अन बघता बघता पुर्ण पिक नष्ट झाले.शेतकऱ्यांना अतिवृष्टीन दिलेल्या वेदनांवर प्रशासनाने मदतीचा हात देण अपेक्षित होत पण पंचनाम्यापुढ कूठलीच कार्यवाही झाली नाही.मागील वर्षीपासून शेकडो शेतकरी आर्थीक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.पण दप्तरदिरंगाई
ने हददच केल्यान आता शेतकरी प्रचंड संतापले आहेत.या संतापलेल्या शेतकऱ्यांनी पःचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य मनीष वासमवार यांची भेट घेत हि गःभीर समस्या बोलून दाखविली.तालुक्यातील संवेदनशिल मुद्यावर आवाज उठविणार्या वासमवार याःनी तातडीन प्रशासनाला निवैदन देत मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची तातडीन मदत द्या अन्यथा आःदोलन करण्याचा इशारा दिला
यावेळी त्यांच्यासोबत किशोर फारकडे,अशोक गौरकार,चांगादेव गिरसावळे,माधव किन्नाके,शंकर गधेकार,मारोती चिलनकर,बाबुराव चौधरी,वसंत भोयर,धनराज राऊत,भास्कर कुळमेथे,दुर्योधन कुळमेथे,जगन्नाथ गोहणे या कूलथा येथील शेतकर्याची उपस्थीती होती.
आंदोलन करणार….
चक्क वर्ष लोटूनही कुलथा येथील शेकडो शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देण्यात आली नाही.
यावरून प्रशासन किती झोपेत आहे.हे स्पष्ट होत आहे.येत्या आठ दिवसात मदत दिली नाही तर तिव्र आःदोलन करू…
मनीष वासमवार
सदस्य पंचायत समिती,गोंडपिपरी.