चंद्रपूर / कैलाश दूर्योधन
शिवसेना जिल्हा चंद्रपुराच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाने अभिनेत्री कंगना राणावतच्या पुतळयाचे दहन शिवसेना जिल्हा कार्यालयसमोर करण्यात आले. ज्या मुम्बई मधे राहून पैसा ,प्रसिद्धि आणि नाव कमविले त्या मुम्बईची आणि मुम्बई पोलिसांची बदनामी कारित आहे आता तर कंगना रानावतच्या पुतळा जाळला यानंतर तिने मुम्बई पोलिसांची माफी मागितली नाही तर यानंतर कंगना रानावतचे चित्रपट चंद्रपुर मध्ये प्रसिद्ध होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, शिवसेना महिला आघाडीचे भारतीताई दुधानी, वर्षा कोठेकर, कुसुमताई उदार, मन्ती कुशवाह, शोभाताई वाघमारे, माया पटले, अशोक चिरखरे, हर्षल कानल्लीवार, सोनू ठाकुर, हेमराज बावणे, करण वैरागड़े,राहुल विरुटकर, सिकंदर खान, वसीम खान, देवा इंगोले, विक्रम सहारे, अक्षय अबिवार, विश्वास इटनकर, अजय मोरवानी, राहुल पायघन, सुरेश नायर, व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.