बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : असह्य होणारी ऊन,उकाड्याने अंगाची लाही लाही होत असताना विजेची सतत लपा छूपी असल्याने शहरातील व गाव पाड्यावरील नागरीक अक्षरशः हैराण होत असल्याचे चित्र आहे.स्थानिक महावितरणाच्या विरोधात नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून काय करावे,काय नाही ? हेच समजनासे झाले आहे.लोकसभेची आचारसंहिता लागू असल्याने शहरात मोर्चा सुध्धा काढता येत नाही? याचा फायदा घेत महावितरण ग्राहकांना ” तोंड दाबून बुक्क्यांचा मार ” देत असल्याची संतप्त प्रक्रिया उमटत आहे.
सद्या कड्क उन्हाचा तडाखा कायम असून जून महिना आला तरी सूर्य तप्त आग ओकतोय ,अशा परिस्थितीत तापमान ४५ अंश डिग्रीसेल्सिअस पर्यंत पोहचला आहे.असे असताना दिवसा आणि रात्रीच्या सुमारास देखील विजेची ‘ आंख मेचोली “सुरू आहे.सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वयों-
वृध्द पुरुष,महिला हैराण झाले आहेत.पंखे,एसी,कुलर बंद पडत असल्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक उखड्याने त्रस्त आहेत.
महावितरण विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरीक व उद्योजकांना फटका बसत आहे.वीज खंडित झाल्याने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती साठी संपर्क केला ,असता फोनच उचलत नाही, उचलेले तर माहिती घेऊन सांगतो,आदी कारणांमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.जिवती, मराई पाटण, वाडिगुडा, राहापल्ली बु.,टेकामांडवा,शेदवाही,भारी,
बाबापुर, या परिसरातील मागील वीस दिवसापासून विजेचा लपंडाव सतत सुरू असल्यामुळे एन उन्हाळ्यातील वाढत्या तापमाना सामोर जात असताना नागरिकांना अक्षरशः नर्क -यातना भोगावी लागते आहे.गेल्या काही दिवसापासून अवेळी वीज जाण्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.
पूर्णतः वेळ वीज सुरळीत करावी अशी मागणी जिवती परिसरातील नागरिकांतून महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.