Homeचंद्रपूरमहाराष्ट्राची पहिले टेलीमेडिसीन तंत्रज्ञान युक्त हायटेक कॅन्सर तपासणी

महाराष्ट्राची पहिले टेलीमेडिसीन तंत्रज्ञान युक्त हायटेक कॅन्सर तपासणी

घुग्घुस (चंद्रपुर) : जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या विचाराने प्रेरित, विजय किरण फाउंडेशन च्या वतीने,तसेच विजय वडेट्टीवार यांच्या इच्छाशक्तीतून व शिवानी वडेट्टीवार, सरचिटणीस- युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष- विजय क्रांती कामगार संघटना, यांच्या संकल्पनेतून साकारलेले, फिरते कॅन्सर हॉस्पिटल आपल्या दारी येत आहे, तरी गावातील सर्व लोकांनी नियोजित स्थळी आणि वेळी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा ही विनंती विजय किरण फाउंडेशन च्या वतीने करण्यत येत आहे.

दिनांक 12 व 13 फरवरी 2024, स्थळ: स्नेहप्रभा मंगल कार्यालय, घुग्घूस आणि दिनांक 14 व 15 फरवरी 2024, स्थळ: हनुमान मंदिर, पांढरकवडा,वेळ सकाळी 10:00 वाजेपासून तर संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत करण्यत येत आहे.

रक्तदाब, मधुमेह, अस्थमाचे आजार, 45 अधिक रक्तांच्या तपासण्या, किडनी विकार, मानसिक आजार, त्वचारोग, टीबी अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग निदान, रक्तदोष, श्वासनाचे विकार, तसेच पोटांचे विकार अत्याधुनिक मेमोग्राफी मशीन (स्तनाच्या कॅन्सरचे निदान), अत्याधुनिक X-Ray मशीन (सर्व प्रकारचे X- Ray), अध्यावत पॅथॉलॉजी प्रयोगशाळा, 45 हुन अधिक प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, अद्यावत दंतचिकित्सा युनिट, मुख कर्करोग तपासणी, ECG- रक्तदाब, पल्स रेट, बॉडी मास इंडेक्स, ब्लड शुगर, स्पायरोमेट्री (फुफ्फुस क्षमता तपासणी), लहान मुलांचे श्वसनाचे आजार, गर्भवती स्त्रियांमध्ये Eclampsia तसेच Preeclampsia चे निदान, या शिबिरात आपणास मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयांचा कर्करोग, व इतर कर्करोग तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येईल.

खालील गोष्टीमुळे सर्वसामान्य जनतेला उपचार घेणे कठीण झाले आहे.
वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य रुग्णांना महागडे उपचार घेणे परवडत नाही.
शिक्षण असून देखील प्रचंड प्रमाणात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुणांना आर्थिक दृष्ट्या घरच्यांना मदत करणे शक्य होत नाही.
रोजगार न मिळाल्याने आलेल्या निराशातून व्यसनाधींचा वाढत आहे, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे.
स्पर्धा परीक्षा मधील गैरप्रकार आणि पेपर फुटी मुळे तरुणांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे.
शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने, आरोग्यावर खर्च करणे देखील शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्यास, अनेक महिला दुखणे अंगावर काढतात महिलांच्या आरोग्याकडे सरकारचे लक्ष नाही.
सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे आरोग्य व्यवस्था कोलमोडली आहे, गरजू आणी गरिबांना उपचार मिळणे अवघड झाले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!