बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : तहसील कार्यालयासमोर तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने ७ डिसेंबर पासून सतत अन्नत्याग आमरण उपोषण अन्न मागण्यांसाठी चालू आहे.तरीही सातवा दिवस असूनही हे बेजवाबदार प्रशासनाणी दखल घेतली नाही.दरम्यान बुधवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा गावांत संतापलेल्या शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून टायर जाळून शासनाच्या विरोधात आवाज देण्यात आला.
शेतीचे पट्टे द्यावे,सर्व संगणक परिचालक यावलकर समितीच्या शिफरीशींनुसार सुधारीतआकृतीबांधत सामावून घेऊन किमान वेतन देण्यात यावे,यासह अन्य मागन्यांणा घेऊन तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अन्यात्याग उपोषण सतत चालु आहे.
लक्ष्मण मंगाम,या उपोषणकर्थाची अतिशय खालावल्याने त्यांना दोन दिवसाचा अगोदर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.तर मंगळवारी रात्री उशिरा मुकेश चव्हाण यांचीही प्रकृती खालावली असून तिघांची तब्येत चिंताजनक आहे. दिवसेदिवसे उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.
बुधवारी तर सर्व उपोषणकर्त्याना उपोषणस्थळी सलाईन लावण्यात आल्या.शासन प्रशासनाने दखल घेतली नाही.म्हणून आंदोलकासह नागरीक संतापले.उपोषणकर्ते सुग्रीव गोतावळे,सुदाम राठोड,लक्ष्मण मंगाम, शबीरभाई जांहागीरदार,मुकेश चव्हाण,विनोद पवार,प्रेम चव्हाण,विजय गोतावळे ,दयानंद राठोड,बालाजी वाघमारे यांच्या बरेवाईट झाल्यास शासन जबाबदार राहणार असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.