जिवती (ता. प्र.) : राज्यात एकमेव ३६५ दिवस चालणारी शाळा म्हणून पालडोह येथील जिल्हा परिषद शाळेची महती आता सर्वदूर पसरली असून या शाळेने राज्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. या शाळेला नुकतेच यवतमाळ वरून काही शास्त्रज्ञ, रिटायर्ड अडिशनल ceo, व्यापारी, महाराष्ट्र CSR फंडचे प्रमुख व इतर तज्ञ मंडळी यांच्या समवेत महाराष्ट्राचा फुंगसुक वांगडू म्हणून ओळखल्या जाणारा अजिंक्य कोत्तावार यांनी शाळेला भेट देऊन ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेला समजून व जाणून घेतले.
इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले शास्त्रज्ञ, उद्योजक ज्यांना महाराष्ट्रचा फुंगसुक वांगडू म्हणून ओळखल्या जाते असे अजिंक्य कोत्तावार ज्यांच्या नावावर आज जवळपास ३२ पेटंट उपलब्ध आहे. अशा तरुण संशोधक यांची मुलाखत शाळेतील सवांददाता विद्यार्थी आदित्य बाजगीर यांनी घेतली. या मुलाखतीतून सरकारी शाळेविषयी त्यांचे मत जाणून घेतले.
यावेळी शाळेचे शिक्षक, पानघाटे, वेलादी, शिक्षण प्रेमी शेख मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी आदी उपस्थित होते.