चंद्रपूर – बजाज फाऊंडेशन, वर्धा व विश्व युवक केन्द्र , दिल्ली तर्फे चार दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन सेवाग्राम, वर्धा येथे दिनांक २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान केले गेले आहे. या कार्यशाळेत नैसर्गिक शेती, पाण्याचे संवर्धन, चेक डॅम या विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि वेगवेगळ्या सतरा राज्यातून विवीध संस्थेचे संचालक व शेती आणि पाणी विषयावर काम करणारे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.
स्वप्नील हा युवा कवी, साहित्यीक आहे. विवीध वर्तमानपत्रात कविता प्रकाशित झाल्या आहेत. कवी, ग्राफिक्स डिझायनर, सुत्रसंचालक, निवेदक म्हणून त्याने ओळख मिळवली आहे. सामाजिक कार्यात तो सक्रीय आहे व विविध संस्थेत काम करतो. प्रज्ञा हिला सामाजिक कार्याची आवड आहे. गरजवंतासाठी नेहमी धावून जाते. रक्तदान करायला खूप आवडते. नुकतेच तीने दहावे रक्तदान केले.
महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थी सहभागी झाले. या निवडीसाठी दोघांनीही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल साकूरे, प्रा. डॉ. जयश्री कापसे मॅम व सर्व प्राध्यापक वृंदाचे आभार व्यक्त केले. या निवडीसाठी दोघांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.