जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील जिवती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत माराईपाटण येथील प्रभाग क्रमांक- १ मध्ये नाली उपसाचे काम आठ महिन्यापासून झाले नसल्याने प्रभागात राहत असलेल्या नागरिकांच्या घराभोवतीच दुर्गंधीयुक्त माती नाली पाण्याचे डबके तयार झाले आहेत.
स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या ग्राम पंचायत प्रशासनाची प्रभागात अस्वच्छता निर्माण करण्यात पुर्ण मदत झाली,असे म्हणता येऊ शकेल,स्वच्छ भारत मिशन राबवत सगळीकडे स्वच्छ्ता असायला पाहिजे, असे सरकारचे धोरण असते.परंतु स्थानिक ग्राम पंचायत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. गाळ साचून असल्याने पाण्याला प्रवाह नाही,तर दुर्गंधीत पाण्याचे नाली पूर्णपणे मातीगाळ साचलेले आहेत. येथील दुर्गंधीमुळे व दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या ,महिलांच्या,लहान मुले मुली यांच्या आरोग्य धोकादायक ठरतं आहे.परिसरात अनेक आजारी पडण्याचे प्रमाण आधीच अधिक वाढलेले आहे.
या दुर्गंधीमय पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव/उपद्रव मोठ्या प्रमानात वाढला असून,साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून, पालकांना अस्वच्छतेची चिंता भेडसावत आहे. माराईपाटण ग्रामस्थ यांची व लहान मुले आणि मुली यांचा पण दुषित पाण्यामुळे साथरोग पसरून लोकांना हानी पोहचू नये म्हणून,गावातील तरुण युवकांनी नाली उपसा स्वच्छता मोहीम हाती घेतली असता,त्यांनी लगेच एक ट्रॅक्टर ट्रॉली चा,बंदोबस्त करून त्यांनी नाली सफाई चे काम हाती घेतले. लगेच नालितील गाळ काढून ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे गावाच्या बाहेर टाकण्यात आले.त्यामुळे पुढील पावसाच्या काळात नालीची समशा व कोणाच्या घरात व दारात नालीतील दूषित पाणी जाणार नाही. व आरोग्य, डास, मछर,यांचा फारसा परिणाम कमी होइल.
त्यामुळे त्वरीत ग्राम पंचायत माराईपाटणच्या वतीने या
समस्या तात्काळ सोडवाव्यात,अशी ग्रामस्थांची
मागणी आहे.ती पूर्ण करण्यात आली.