Homeचंद्रपूरराजुरासमाजकल्याण वसतिगृहात वाढत्या समस्यां राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद...

समाजकल्याण वसतिगृहात वाढत्या समस्यां राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांनी दिले  निवेदन…

राजुरा: शाळा, महाविद्यालय सुरू होऊन एक आठवडा उलटून सुद्धा राजुरा येथील समाज कल्याण वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश अजून दिलेला नाही.

सदर विद्यार्थी हे राजुरा तालुक्यातील तथा जिवती सारख्या दुर्गम भागातून वस्तीगृहात प्रवेश घेतात परंतु वसतिगृहांमध्ये भोजनपुरवठा ठेकेदार उपलब्ध नसल्यामुळे वस्तीगृह विद्यार्थ्यांसाठी अजून खुले करण्यात आले नाही.
त्यामुळे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना बाहेरून रूम करून व बाहेर हॉटेलमध्ये सकाळ संध्याकाळ जेवण करून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
करिता संबंधित विभागाने या विषयाकडे त्वरित लक्ष देऊन ही समस्या लवकरात सोडवून विद्यार्थ्यांना न्याय द्याल अशी अपेक्षा निवेदनाद्वारे करण्यात आली.
अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांनी दिला आहे.
यावेळी आसिफ सय्यद यांच्यासोबत वस्तीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!