जिवती : ( तालुका प्रिनिधी) तालुका जिवती अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील पाटागुडा गावातील राजाराम तोगरे यांचा मुलगा स्व,जीवन राजाराम तोगरे हा दिनांक १/०६/२०२३ पासून लापता झालेला,आणि अचानक दिनांक ०४/०६/२०२३ रविवारला सकाळी मरकागोंदी च्या शेतशिवरा मधील जंगलात एका झाडाखाली नागरिकांना त्यांचा मृतदेह
कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे.व पोस्टमार्टम जागेवरच केला आहे. यावरून आई, वडील व नातेमंडळी यांचा शंकाजनक ठाम आरोप आहे की,माझ्या मुलाचा घात केलेला आहे.व मित्रमंडळीत परिसरातील आणि समाजामध्ये मृत्यू बाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे.महणून मातंग समाज अन्याय निवारण समितीच्या वतीने सदर प्रकरणाचा तपास हा उच्चस्तरीय
करण्यात यावा.
आणि घातपात झाला असेल तर,प्रकरणामध्ये जो कोण्ही दोषी आढळल्यास आरोपीवर कठोरात कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी. व गुन्हे दाखल करण्यात यावे.स्व,जीवन तोगरे यांच्या मृत्यूचे खरे कारण काय? हे समाज बांधव व त्यांच्या कुटुंबीयांना कळावे, स्व,जीवन तोगरे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी मातंग समाज अन्याय निवारण समितीच्या मध्यातून तहसील कार्यालय जिवती,येथे तहसीलदार जिवती यांना निवेदन देण्यात आले.
उपस्थित समाज बांधव व (मा.स.अ.नी.स.)पदधिकारी डॉ.अंकुश गोतावळे,व्यंकटी बळीराम तोगरे,दतात्रय सोपान शिकारे,बालाजी गणपत वाघमारे,दशरथ सटवाजी पलमेटे,अंकुश कांबळे,नवनाथ जांभळे,दत्ता तोगरे,मधुकर गायवाड,मनोहर गायवाड,चरणदास केदासे,रामचंद्र केदासे,विजय गोतावळे,दत्ता गायवाड,रंगराव तोगरे,अंगद गुंडले,कृष्णा चव्हाण,संभाजी ढगे,रणजित मसुरे, वैजेनाथ सूर्यवंशी,जयसिंग गायकांबळे,चक्रधर तोगरे,बालाजी वाघमारे ईत्यादी व समाज बांधव उपस्थित होते.