Homeचंद्रपूरग्राम पंचायत सकमूरच्या निष्काळजीपणामूळे गावकऱ्यांची तहान चवाट्यावर... पिण्याचा पाण्यासाठी गावकऱ्यांची धरणे आंदोलन...

ग्राम पंचायत सकमूरच्या निष्काळजीपणामूळे गावकऱ्यांची तहान चवाट्यावर… पिण्याचा पाण्यासाठी गावकऱ्यांची धरणे आंदोलन व उपोषण…

– सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील सकमूर येथे गावकऱ्यांनी पाणीकर भरूनही शासनाने नळयोजना बंद केले.गावकऱ्यांचा तक्रारीवरून ग्राम पंचायत पाणीकर भरले नसल्याचे निदर्शनास आले. गाव नदिकाठी असूनसद्धा दूसरा पाणी स्रोत नाही प्रादेशिक पाणी पूरवठा योजना अंतर्गत नळ योजनेचा लाभ घेत असतांना गावकऱ्यांना वारंवार अनेक संकटांचा सामना ग्राम पंचायत चा भोंगळ कारभारामूळे सहन करावा लागत आहे.

दि 03-02-2023 रोजी गावकर्यांनी उपोषण सूरू केले. 3 तासाचा उपोषणानंतर गोंडपिपरी तालुक्याचे विकास अधिकारी माऊलीकर, न्याय तहसीलदार, मंडलाधिकारी यांनी आंदोलनास भेट दिले. महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक,व मस्त्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तत्काळ गंभीर समस्येची दखल घेऊन 2 लाख रू भरून पाणीपूरवठा सूरळीत चालू करण्याचे निर्देश मूख्य कार्यपालन अधिकारी जि प चंद्रपूर यांना देण्यात आले.लगेच त्याची अंमलबजावणी करून गावकऱ्यांसाठी पाणीपुरवठा सूरू करण्यास आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!