प्रलय म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर :- शहर-स्थानिक विठ्ठल मंदिर प्रभागातील लोकांच्या प्रश्नांना घेऊन आक्रोश व्यक्त करत शेवटी राहुल देवतळे यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली…
राहुल देवतळे यांनी,चंद्रपूर महानगरपालिका तर्फे पाणी पुरवठा संपूर्ण शहराला केला जातो परंतु पाणीपुरवठा 182 दिवस केला जातो मात्र पाणी कर 365 दिवसांचा नागरिकांकडून का केला जातो या प्रश्नाला घेऊन वारंवार देवतळे यांनी वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला मात्र मनपा तर्फे कुठलेही उत्तर देण्यात आले नाही…
विठ्ठल मंदिर प्रभागातील गोपालपुरी येथील आनंदनगर,बापूजी नगर,निंबाळकर वाडी,बजरंग चौक,बालाजी वॉर्ड,दानव वाडी,टंडन लेआऊट येथील पाणी पुरवठा नियमित करण्यात यावा आणि प्रभागातील जनतेच्या हक्कासाठी प्रशासनाकडून होणारी जनतेची लूट मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष यांनी स्थानिक महानगरपालिकेच्या समोर उपोषणास सुरूवात केली…..
त्यांचा समवेत संभाजी खेवले,सतीश मांडवकर,आशिष खडसे,नयन डोईफोडे व इतर मित्रपरिवारंचा पाठिंबा आहे…..