प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपुर: चंद्रपुर शहरात रहदारीचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. सण-उत्सव वा काही समारंभ असले तासनतास वाहनाचा रांगा लागून असतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच शहरातील बागला चौक ते बाबूपेठ या मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून असाच प्रलंबित आहे आणि एवढंच काय तर लोकप्रतिनिधीचे सुद्धा दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
तासनतास हा मार्ग रेल्वेमुळे बंद असतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी अनेकदा निर्माण होते. ही समस्या दूर व्हावी म्हणून उड्डाणपुलाची मागणी गेल्या अनेक वर्षपासून सुरू आहे. निवडणूका आल्या की, लोकप्रतिनिधी आश्वासनाचे गाजर देतात आणि निवडणूका संपल्या की मतदारांना विसरून जातात. त्यामुळे या मार्गावरील उड्डाणपूलासाठी येणारा निधी जातो कुठे? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
उड्डाणपूलाचे बांधकाम कागदावर होत आहे का? असा संशय नागरिक घेत आहेत. कारण नागरिकांना दररोज होणारा त्रास हा दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु कोनतेही प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे.