बळीराम काळे/जिवती
जिवती(ता.प्र.) संपूर्ण देश हा मोठ्या उत्साहात स्वतंत्राचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना दिसत आहे.
दुसरीकडे मात्र जिवती तालुक्यातील ग्राम पंचायत भोक्सापुर अंतर्गत भोक्सापुर, आनंदगुडा, संगनापुर व गोंदापुर हे गाव वगळता सर्व गावात जाण्यासाठी रस्ते आहेत. ३० ते ३५ वर्षापूर्वी गोंदापुर हे गाव वसले आहे.
तरीसुध्दा स्वतंत्राच्या ७५ वर्षानंतरही गोंदापुर या गावी ये जा करण्यासाठी सादा खडीकरणाचा व्यवस्थित रस्ता सुद्धा बनवीन्यात आला नाही.
आजघडीला मोठ मोठे दगड रस्त्यावर पाव्हयास मिळत आहे.स्वातंत्र्याची पहाट कधी उजाडेल याची मागील
३० ते ३५ वर्षापासून गोंदापुरवासीय अतूर्तेने वाट पाहत आहेत. सतत पावसाच्या मारपिठीने तर रस्त्याची भयावह अवस्था झाली असून,रस्त्याविना गाव अस चित्र दिसत आहे.रस्ता द्या अन्यथा विना रस्त्याचे गाव म्हणून
गिनीज बुकात नोंद करा,अशी संतप्त मागणी गावकऱ्यांनी केली आहे.शासनाचे धोरण
‘ गाव तिथे रस्ता ‘ हे ब्रीदवाक्य असले तरीही आदिवासीबहुल,अतिमागास,अतिदुर्गम तालुक्याच्या भागातील अनेक छोट्या छोट्या गाव,गुड्यावर, पाड्यावर, तांड्यावर जाण्यासाठी रस्ते नाहीत.
ग्राम पंचायत भोक्सापुर येथील गोंदापुर या गावी जाण्यासाठी खडीकरण केलेला सुद्धा रस्ता नाही.