बळीराम काळे/जिवती
जिवती:तालुक्यातील गुणवंत विद्यालय टेकामांडवा येथे कै. अण्णा भाऊसाठे यांच्या जयंतीनिमिताने विद्यार्थी व बहुउद्देशीय जनकल्याण संस्था जिवतीच्या वतीने एक दिवशीय वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला.आणि झाडे लावून झाडांची जोपासना केली असता झाडापासून मानवी जीवनात किती महत्व असतो व झाडे जर नष्ट झाली म्हणजे मानवी जीवनात खुप काही परिणाम होऊ शकतात, तर मानवी जीवनात नव्हे तर जीव जंतू प्राणीमात्रावर देखील दुष्परिणाम होऊ शकतात .
म्हणून झाडे लावणे,झाडांची लागवड करणे. म्हणजे प्राणीमात्रावर प्रेम करणे होय,म्हणून
“झाडे लावा झाडे जगवा”आणि भारत देश वाचवा;
हे विसरता कामा नये अशी अपेक्षा विद्यार्थी व विद्यार्थीनिस आपल्या शब्दातुन मान्यवरांनी माहिती दिली.
बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेचे सभासद ज्ञानेश्वर माने,प्रा.उद्धव माने,प्रा.केशव पवाडे,यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
वृक्ष रोपणासाठी नर्सरीतून विविध प्रकारच्या जातीचे झाड मागविण्यात आली होती.या वेळी राव,जोगदंड,संजय गीते,वडेट्टीवार, तांबरे यांची उपस्थिती होती.