प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपुर: स्थानिक आरवट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सहारा पार्क कॉलनी आणि राजनगर कॉलनी येथे प्रचंड प्रमाणात एकदा नाही तर दोनदा महापूर आला. यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात त्यांचे खाद्य पदार्थ, कपडे इतर गरजू वस्तू या पूर्णपणे पाण्यात वाहून गेल्या.
या कठीण परिस्थितीत लोकांचे खायचे सुद्धा वांदे झाले असताना फुल नाही पण फुलाची पाकडी का होईना,
महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांच्या पुढाकाराने आणि आरवट ग्रामपंचायत येथील प्रथम नागरिक सरपंच सुलभा ताई भोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू नागरिकांना धान्य किट वाटप करण्यात आली.
यावेळी ग्राम.पं.आरवट येथील सदस्य मनीषाताई डवरे,नकुल येरोजवार आणि विजय मेश्राम उपस्थित होते.