Homeअहेरीस्वराज्य फाउंडेशन तर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याचे वाटप..

स्वराज्य फाउंडेशन तर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याचे वाटप..

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी:-तालुक्यामध्ये मागील दहा दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अहेरी उपविभागातील अनेक गावामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या पुरामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून यात नागरिकांचे जीवनावश्यक साहित्य पुरात वाहून गेले. सोबतच काही घरांची पडझळ सुद्धा झाली. त्यामुळे अनेक संसार रस्त्यावर आले. या सर्व घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वराज्य फाउंडेशन, गडचिरोली तर्फे दि १८/०७/०२२ रोजी गोल्लाकर्जी, निमलगुडम, गुड्डीगुडम या तीन पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करून तेथील पूरग्रस्त नागरिकांची आस्थेने विचारपूस करून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

पूरग्रस्तांना अशा कठीण प्रसंगी मदत मिळाल्याने ते समाधानी झालेत. त्यामुळे त्या गावातील नागरिकांनी अश्या वाईट वेळेत तुम्ही येऊन भेट घेतली. हेच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असे बोलून समाधान व्यक्त केले.

यावेळी गावातील नागरिक व स्वराज्य फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. समोरही आम्ही तुमच्यासाठी तत्पर उभे राहून अशीच मदत आम्ही करत राहणार. पुढे तुम्हाला कोणतीही मदत लागेल तर स्वराज्य फाउंडेशन ला संपर्क साधा असे या स्वराज्य फॉउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!