गडचिरोली: गडचिरोली आणि आसपासच्या शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करून, आणि उत्पादन घेऊन उपजिवीका करता येईल या उदात्त हेतूने शासनाकडून जमीनीचे वाटप करण्यात आले. परंतु शहरातील काही महाभागांनी पैशाच्या जोरावर जमीनी विकत घेऊन प्लाट विक्री सुरू केली आहे. या बाबींकडे मा. जिल्हाधिकारी यांनी पराकोटीने लक्ष केंद्रित करून हा प्रकार थांबवुन जनतेला योग्य न्याय द्यावा.
सध्याच्या स्थितीत गडचिरोली शहरात प्लाट विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. त्यासाठी अनेक एजंट म्हणून काम करीत आहेत. भूदान.– पट्ट्याच्या जमीनी अशा प्रकारे विकल्या गेल्या तर अनेक शेतकरी भूमीहीन होऊन उपजीविकेचे साधनांपासून वंचित राहातील.
शासनाने उपजिवीका करण्यासाठी दिलेल्या जमीनी ह्या मा. जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांच्या परवानगी शिवाय विकता येत नाही. असा नियम असला तरी जमीनी विकत घेऊन प्लाट विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. यासाठी महसूल विभागच छुप्या मार्गाने परवानगी देत आहे का❓ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्लॉट तयार करतांना शासकीय कार्यालयात जाऊन बरेच कागदपत्र तयार करावी लागतात. त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी डोळे झाकून काम करतात का❓गडचिरोली शहरालगत असलेल्या नवेगाव, कोटगल , इंदाळा, पारडी परिसरात अनेक शेतकरी , कामगारांना उपजिविका करण्यासाठी शासनाने शेतजमीन दिली आहे. मात्र या जमीनी प्लाट करून विविध प्रकारच्या मार्गाने विकली जात आहे.
अनेक महाभाग अशा जमीनी विकत घेऊन आणि ले आऊट टाकून बिनधास्तपणे विकत आहेत. सद्यास्थितीत कोटगल येथील वसंत मेश्राम यांना शासनाकडून मिळालेली जमीन श्याम कश्यप यांनी विकत घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
वसंत मेश्राम भूमीहीन होणार नाही यासाठी श्याम कश्यप यांनी आगळे वेगळे मार्ग शोधून भूदानाची मिळालेली जमीन विकत घेण्याचा कट रचला आहे.
श्याम कश्यप यांनी प्लाट विक्रीचा व्यवसाय करीत असताना सोबत असलेल्या बिझनेस पार्टनरचीही फसवणूक केल्याचे चर्चिले जात आहे. लाभांशची रक्कम दिली नाही. लाभांशची रक्कम मागीतली असता टाळाटाळ केली जाते . लाभांशची रक्कम अदा करण्यासाठी दिलेले धनादेशही वटले नाही. याबाबत सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी.