प्रशांत शाहा ब्युरोचीफ
गडचिरोली: महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा व छत्तीसगढ राज्यातील कांकेर जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असणारा राज्य मार्गाचे पुलाचे काम सध्या जोमात सुरू आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार या मार्गावरील अनेक पूल मंजूर केले आहेत. महाराष्ट्र व छत्तीसगढ ला जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग ठरणारा असून या मार्गावर अनेक छोटे मोठे पूल आहेत सध्या या संपूर्ण पुलाचे बांधकाम सुरू आहे. चार ते पाच पुलाचे काम पूर्ण झाले असून काही पुलाचे काम प्रगती पथावर आहे.
येत्या वर्ष भरात सर्व पुलाचे काम पूर्ण होऊन हा मार्ग मोकळा होणार व महाराष्ट्र व छत्तीसढ राज्य जुळणार
यात महाराष्ट्रातील नक्षल ग्रस्त म्हणून ओळखल्या जाणारा गडचिरोली जिल्हा व छत्तीसगढ राज्यातील नक्षल ग्रस्त कांकेर जिल्हा व नारायपूर जिल्हा जुळणार आहे हे विशेष.
दोन्ही राज्याला जुळणारा हा मार्ग गडचिरोली जिल्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखल्या जाणारा चामोर्शी तालुक्यातील घोट रेगडी व एटापल्ली तालुक्यातील कसनसुर जारावंडी येथून कांकेर जिल्ह्यातील पखांजूर येथे जुळतो.