Homeचंद्रपूरसातबारा खोडतोड व वाटप जमीन "खरेदी-विक्री "प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर...

सातबारा खोडतोड व वाटप जमीन “खरेदी-विक्री “प्रकरणात तलाठ्याने निष्काळजीपणा दाखवून सुध्दा त्याचेवर अद्याप कारवाई नाही ! कागद पत्रे मागण्यास या पलिकडे तहसील कार्यालयात येवू नये तहसीलदार ने प्रिया झांबरेला चक्क बजावले

चंद्रपूर :-बल्हारपूर तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण उघडकीस आणणा-या प्रिया झांबरे यांना परत तहसील कार्यालयात कागदपत्रे मागण्यास येवू नये असे खडे बोल तहसीलदार संजय राईंचवार यांनी सुनावले असल्याचे वरिष्ठांकडे केलेल्या एका तक्रारीत झांबरे यांनी म्हटले आहे.दरम्यान त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण व वाटप जमीन खरेदी-विक्री प्रकरणात राज्याचे मुख्य सचिवांसह नागपूरचे महसूल आयुक्त व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे कडे लेखी तक्रारी नोंदविल्या होत्या .याच प्रकरणाच्या अनुषंगाने युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी उपरोक्त प्रकरणात जे कोणी दोषी अधिकारी, मंडळ अधिकारी,व पटवारी जबाबदार असतील त्यांचेवर रितसर कारवाई करावी अशी मागणी केली होती .

गेल्या सात वर्षांपासून तलाठी दप्तर सातत्याने हाताळणा-या तलाठी रोहित सिंग चव्हाण यांनी तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरण व वाटप जमीन खरेदी-विक्री (विना परवानगीने झालेले)प्रकरणाची माहिती आजपावेतो वरिष्ठांकडे दिली नव्हती .या सर्व बाबतीत त्यांचा प्रत्यक्ष निष्काळजीपणा दिसत असताना देखिल त्यांना या प्रकरणात वाचविण्याचा खटोटोप तहसीलदार राईंचवार करीत असल्याचा चक्क आरोप युवा स्वाभिमान पक्षाच्या बल्हारपूर महिला अध्यक्षा प्रिया झांबरे यांनी वरिष्ठांकडे केलेल्या एका निवेदनातून केला आहे . सातबारा मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे आदेश तहसीलदार करीत आहे . त्या आदेशाचे फेरफार पटवारी नोंदवहीत घेत आहे तर मंडळ अधिकारी ते फेरफार रुजूवात करीत असल्याचे समजते.आज पर्यंत सदरहु पटवा-यांने तलाठी दप्तर मधील सातबारा खोडतोड प्रकरणाची बाब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणून दिली नाही ते मागचे नेमके कारणे काय हे तलाठ्यासचं ठाऊक ? तहसीलदार यांनी अन्य एका प्रकरणात तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचा अहवाल मागितला त्यांनी चक्क अहवालात लिहले की रेकॉर्ड एकदा आम्ही तुमच्या कडे दिल्यावर फेरफार घेणे व फेरफार रूजू झाल्यावर तो रेकॉर्ड दुरुस्त करणे हे तलाठ्याचे आद्य कर्तव्य आहे.त्या कार्यालयाचे उत्तर संयुक्तपणे आहे.

आता या सर्व प्रकरणात बल्हारपूर तहसील कार्यालय स्तरावरुन चौकशी सुरु आहे . परंतु या चौकशीला म्हणावी तशी गती प्राप्त झाली नाही.तहसीलदार संजय राईंचवार व पटवारी रोहित सिंग यांचे मधुर व गोडी गुलाबीचे संबंध असल्याचा उल्लेख झांबरे यांनी एका निवेदनातून केला आहे.सुरज ठाकरे आता या प्रकरणाच्या अनुषंगाने लवकरच वरिष्ठ अधिका-यांची भेट घेणार असल्याचे कळते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!