Homeनागपूरतिरपुडे समाजकार्य महाविद्यालयामध्ये 'समुपदेशनाची गरज आणि प्रक्रिया' या विषयावर एक दिवसीय सेमिनार...

तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयामध्ये ‘समुपदेशनाची गरज आणि प्रक्रिया’ या विषयावर एक दिवसीय सेमिनार संपन्न

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर: युगांतर शिक्षण संस्था द्वारा संचालित तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या ‘ऍडव्हान्स पि जी डिप्लोमा इन कॉन्सलिंग’, ‘वन इयर डिप्लोमा इन स्कुल कॉन्सलिंग’ आणि इनर व्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समुपदेशनाची गरज आणि प्रक्रिया’ या विषयावर एक दिवसीय प्रादेशिक स्तरीय सेमिनार गुरुवार, दि, २४ मार्च २०२२ ला तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय (स्वायत्त संस्था), सिव्हिल लाईन, सदर, नागपूर येथे संपन्न झाले. या सेमिनारला १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

या सेमिनारच्या उदघाटन कार्यक्रमाला उदघाटक आणि मुख्य वक्ता म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर च्या मानसशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एन. आर. मृणाल उपस्थित होते. उदघाटन सत्राला संबोधित करतांना त्यांनी आजच्या काळात समुपदेशनाची गरज आहे असे मत व्यक्त केले. सोबतच एच आय व्ही रुग्णांचे समुपदेशन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. उदघाटनीय सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रिटा अग्रवाल, डॉ. स्वाती धर्माधिकारी, डॉ. शिल्पा पुराणिक, प्रा. शिल्पा जिभेनकर, प्रा. संध्या फटींग, श्रीमती पदमा देठे आणि कोमल अकबारी उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन स्वर्णिमा कमलवार यांनी केले तर आभार डॉ. शिल्पा पुराणिक यांनी मानले.

सेमिनारच्या पहिल्या सत्रात ‘समुपदेशनातील नवीन तंत्र आणि पद्धत’ या विषयावर प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ श्रीमती रिता अग्रवाल यांनी समुपदेशन करतांना आवश्यक असलेले विविध तंत्र आणि पद्धती विद्यार्थ्यांना सांगितल्या. सोबतच समुपदेशनाच्या विविध थियरी विषयी अमूल्य असे मार्गदर्शन केले. या सत्राला अध्यक्ष म्हणून डॉ. शिल्पा पुराणिक उपस्थित होत्या. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन औरा गब्रिअल यांनी केले तर आभार स्निग्धा सिंग यांनी मानले.

दुसऱ्या सत्रात ‘समुपदेशनाची प्रक्रिया’ या विषयावर तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन करतांना समुपदेशनाच्या विविध प्रक्रिया बद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. सोबतच प्रक्रियेत विविध स्तर याबद्दल मार्गदर्शन केले. या सत्राला अध्यक्ष म्हणून तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे वरीष्ठ प्राध्यापक डॉ. दीपक मसराम उपस्थित होते. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन आशिष मिश्रा यांनी केले तर आभार अरुणा नंदागवळी यांनी मानले.

तिसऱ्या सत्रात ‘एक चांगला सल्लागार होण्यासाठी काय आवश्यक आहे’ या विषयांवर मार्गदर्शन करतांना कौटुंबिक न्यायालय, नागपूरच्या निवृत्त समुपदेशक डॉ. मंजुषा कानडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे एक चांगला समुपदेशक कसा असावा हे समजावून सांगितले. सोबतच आपले अनुभव शेयर केले. या सत्राला अध्यक्ष म्हणून प्रा. शिल्पा जिभेनकर उपस्थित होत्या. या सत्राचे सूत्रसंचालन मंजुषा मेश्राम यांनी केले तर आभार कल्यानी वरदपांडे यांनी मानले.

त्यानंतर सेमिनारच्या शेवटी निष्कर्ष सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचे सुत्रसंचालन रश्मी सिन्हा यांनी केले तर आभार प्रा. संध्या फटींग यांनी मानले. एक दिवसीय सेमिनारला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी, डॉ. शिल्पा पुराणिक, प्रा. शिल्पा जिभेनकर, श्रीमती पदमा देठे, श्रीमती कोमल अकबारी, प्रा. संध्या फटींग, डॉ. रोशन गजबे, श्रीमती माधवी पेदादा, तांत्रिक सहाय्य दिनेश मंडपे आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!