बळीराम काळे/जिवती
जिवती : तालुक्यातील अति डोंगराळ भागातील सामान्य जनतेला काकबन-पेद्दाआसापूर-घनपठार या गावी येण्या-जाण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांना खूप मोठ्या डोंगरातून जावे लागते. घनपठार वरून शेणगाव हे गाव ३ की.मी. अंतरावर आहे. शेणगाव या गावामध्ये उच्च शिक्षणची सोय असल्यामुळे शिक्षणासाठी पेद्दाआसापूर येथील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी शेणगाव येथे जाऊन शिक्षण घेत आहेत. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना डोंगरातून जाणे येणे करावे लागते तसेच शेणगाव येथे मार्केट करिता नागरिकांनाही जाणे येणे करावे लागते.
विद्यार्थी व सर्व सामान्य नागरिकांना जाणे येणे सोपे व्हावे या करिता संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ रोड चे सर्वे करून रोड च्या कामाला सुरुवात करावी असे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे जय विदर्भ पार्टीचे नेते सुदमभाऊ राठोड यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग गडचांदूर यांच्या मार्फत देण्यात आले
यावेळी सोशल मीडिया प्रमुख विशाल राठोड, युवा तालुकाध्यक्ष रामेश्वर पोले, तालुकाध्यक्ष रियाज सय्यद, शहर प्रमुख विनोद पवार, सचिन पवार उपस्थित होते. आमची मागणी पूर्ण न झाल्यास जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदमभाऊ राठोड यांनी दिला.