दिपक साबने,जिवती
जिवती: खरीप हंगाम संपत आला तरी तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाचे वाटप झाले नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शेतकरी संघटना जिवती तालुक्याच्या वतीने भारतीय स्टेट बॅंक शाखा पाटणच्या व्यवस्थापकांना पीक कर्जाचे तात्काळ वाटप करा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कापूस,सोयाबीन, तूर, ज्वारी, मुंग, उडीद इत्यादी पीकाची लागवड केली आहे. गत वर्षी परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे आणि कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला आहे. पीक कर्जावर आस धरून शेतकऱ्यांना खरीप हंगाम संपत आला तरी पीक कर्जाचे वाटप झाले नाही.शेतकऱ्यांनी सावकारा कडून कर्ज काढून पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकरी अजून जास्त संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची समस्या समजून घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप १० दिवसात करावे अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाटण समोर डफडी बजाओ आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असा इशारा शेतकरी संघटना तालुका जिवतीच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना सय्यद शब्बीर जागीरदार, तालुकाप्रमुख शेतकरी संघटना, रामेश्वर नामपल्ले युवा आघाडीचे तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते