Homeचंद्रपूर"हॅलो चांदा" पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा नॉट रीचेबल विविध समस्येवर "शासकीय...

“हॅलो चांदा” पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा नॉट रीचेबल विविध समस्येवर “शासकीय काम अन बारा महिने थांब” अशी अवस्था

दिपक साबने,जिवती

जिवती: जिवती तालुका हा विविध समस्येने ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत त्या कार्यालयात आपल्या समस्या मांडण्यासाठी व त्याचे निराकरण करण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, महिला , वृद्ध शासकीय कार्यालयात जाण्याच्या रस्त्यापासून तर शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध, महिला हे शासकीय कामापर्यंत समस्याच समस्या आहेत. शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून ही आणि विविध संघटनेच्या माध्यमातून तक्रार करून ही आरोग्य, शिक्षण, दळणवळण, विद्युत पुरवठा, शेती कर्ज अशा नानाविध समस्येने जिवती तालुक्यातील समस्येचे निवारण होताना काही दिसत नाही. शासकीय काम अन बारा महिने थांब अशीच अवस्था जिवती तालुक्याची झाली आहे. विविध समस्येकडे शासनाचा काना डोळा तर लोकप्रतिनिधी कडून हातावर घडी अन तोंडावर बोट अशीच भूमिका दिसून येत आहे.
तत्कालीन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व आता सद्या कार्यरत असलेले महाराष्ट्र विधानसभा लोकलेखा समिती चे अध्यक्ष यांच्या सुपीक डोक्यातून व संकल्पनेतून उदयास आलेले ” हॅलो चांदा ” पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा ही जिल्ह्यातील कुठल्याही समस्येचे तक्रार निवारण करण्यासाठी उदयास आली होती. सामान्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व जनता यामधील दुवा म्हणून ” हॅलो चांदा ” पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा कार्य करीत होती. आपल्या समस्या सामान्य जनतेला मांडण्यासाठी १८००- २६६-४४०१ टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध होती. सदर टोल फ्री क्रमांकाचा वापर करून अनेक समस्यांचे निवारण देखील करण्यात आले.
मात्र आजघडीला जिवती तालुका हा विविध समस्येने ग्रासला आहे समस्येविषयी तक्रारी करून देखील त्यावर अंमल होताना दिसत नाही. ” हॅलो चांदा ” पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रनेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून बघितला असता सद्या हॅलो चांदा नॉट रीचेबल अवस्थेत आहे. त्यामुळे समस्येवर निराकरण करण्यासाठी ची यंत्रणा नॉट रीचेबल येत असल्यामुळे जिवती वासीय हताश झाले आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हॅलो चांदा ही यंत्रणा साकारण्यात आली व तत्कालीन मंत्रीच्या कार्यकाळात कार्यरत होती. मध्यंतरी ऑक्टोबर २०१९ नव्याने विधानसभा निवडणूका झाल्या त्यात एक नंबर चा पक्ष म्हणून भाजप निवडून आला देखील परंतु काही राजकीय घडामोडीमुळे शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षाचे त्रिकुट महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले व सदर यंत्रणा धूळखात पडली.
” हॅलो चांदा ” पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा सुरू होईल काय ? किंवा त्याच धर्तीवर दूसरी यंत्रणा सुरू होईल काय ? नागरिकांच्या समस्या सुटतील काय ? की शासकीय काम अन बारा महिने थांब अशीच अवस्था फेविकाल सारखी सामन्याच्या माथी लागून राहील असे अनेक प्रश्न जिवती तालुक्यासह जिल्ह्यातील सुजाण जनतेकडून व्यक्त केल्या जात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!