- आष्टी प्रतिनिधी- कोविड-19 महामारीमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षापासुन आता पर्यंत १३ करोडपेक्षा अधिक नोकऱ्या गेल्या. NRCB च्या रिपोर्ट नुसार प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी ३८ बेरोजगार आत्महत्या करतात.
यावरती कोणताच नेता किंवा संघटन आवाज उठवतांना दिसत नाही. भारतीय बेरोजगार मोर्चा ने या गंभीर विषयाला घेऊन आज दि. ८ मे २०२१ला काली पट्टी निषेध आंदोलन #BlackBand Protest च आयोजन केल होत. ज्याला घेऊन सोशल मीडियामद्ये Twitter वरती ट्रेंड चालवल. याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांनी सरकारवरती निशाणा साधला आणि या आंदोलनाला यशस्वी केले.
भारतीय बेरोजगार मोर्चा च्या मागण्या आहेत की, ज्या नोकर भरती वरती अघोषीत बंदी आणली आहे ते आताच हटवावे आणि लवकरात लवकर नोकर भर्ती पुर्ण करावे. जोपर्यंत नोकरी मिळणार नाही तोपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता द्यावा. कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद करून सरकारी परमानट भरती सुरू करावी. वय संपायच्या आधी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे. सर्व प्रकारच्या भरती मद्ये महिलांना संख्या च्या प्रमानात प्रतिनिधित्व द्यावे. या मागण्या सरकार समोर मांडल्या आहेत.
सरकारला जाग करायला या आंदोलनाचे दुसर चरण EVM ची प्रतीमा जाळून १२ मे ला आंदोलन करणार आणि तिसऱ्या चरणी १७ मे ला प्रतीकात्मक डिग्री जाळून आंदोलनं होणार.
यावेळी संघशील बावणे, शुभम तावाडे, साहिल साखरकर, पवन कुकुडकर, अमित नगराळे, अखिल नीमागडे, चैतन्य मेश्राम, अनिकेत तवाडे, आयुष ठवरे, स्वप्नील धुरके यांनी गडचिरोली जिल्ह्यात आजच्या आंदोलनाचे नेतृत्व करुन आंदोलनाला यशस्वी केले.