दिपक साबने,जिवती प्रतिनिधी
जिवती : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोविड-१९ चे सर्व नियम पाळत तालुक्याच्या मुख्यालयी म्हणजेच तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी श्रीयुत खलाटे यांच्या हस्ते माजी आमदार निमकर व नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना व दोन दिवसानंतर म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी म्हणजेच तब्बल १३ महिन्यानंतर मराठवाड्यासह पूर्वीचा राजुरा तालुका व आजचे राजुरा, कोरपना व जिवती हे तालुके निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाले.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेततृत्वात लढलेल्या लढ्यात या भागातील देशभक्तांनी सुध्दा भाग घेतला होता. निजामाची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी देशाचे पाहिले गृह मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी सैन्य चढाई चे आदेश देऊन निजामाच्या राजवटीतून याचदिवशी निजामाच्या अधिपत्याखालील संस्थान देशात विलीन केले. व मराठवाड्यासह आजचे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना व राजुरा येथील जनतेला स्वतंत्र मिळाले.
या प्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते देशोन्नती वृत्तपत्रातील “राजुरा मुक्तीसंग्राम दिन” विशेषांकाच्या पुरावणीचे प्रकाशन करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार हरीश गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, न. प. चे मुख्याधिकारी पिदूरकर, पोलीस निरीक्षक बहाद्दूरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे व प्रतिष्ठित व्यक्तीसह कर्मचारी उपस्थित होते.