Homeचंद्रपूरओबीसी समाजाच्या आरक्षण संबंधित विविध मागण्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार...

ओबीसी समाजाच्या आरक्षण संबंधित विविध मागण्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट 

ओबीसी चा बॅक लाॅक तातडीने भरण्याबाबत शासन सकारात्मक – विजय वड्डेटीवार

ओबीसी आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार विजय वड्डेटीवार यांची माहिती

चंद्रपूर / कैलास दूर्योधन

ओबीसी समाजाच्या आरक्षण संबंधित विविध मागण्या मान्य होण्यासाठी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक आयोजित करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पावले उचलण्यात यावी अशी याचना चर्चेच्या माध्यमातून केली आहे.या मागणीला दुजोरा देत ओबीसी चा बॅकलाॅक तातडीने भरण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठी एक समीती नेमणूक करण्याच्या शासनाच्या विचारधीन असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले तसेच ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले असल्याची माहिती विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे.

ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक झाली. बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार,  परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसमवेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केल्यानंतर या बैठीचे फलित म्हणून ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केले असल्याचे विजय वड्डेटीवार यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या मागण्या या बैठकीत मुख्यमंत्रयांसमोर मांडण्यात आल्या तदनंतर ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. ओबीसी मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, ओबीसी चा बॅकलाॅक तातडीने भरण्याबाबत शासन सकारात्मक राहील, त्यासाठी शासणाच्या वतीने एक समीती नेमणूक करण्याचे विचारधीन असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची सरकारला जाणीव असून त्याची पुर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल.असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिले आहे. या समितीने  ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तत्काळ घेता येतील त्याची  प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने  निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत. तसेच टप्प्या टप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!