गोंडपिपरी
गोंडपिपरी तालुक्याला आज वादळी पावसाने अक्षरस झोडपुन काढले. तिन वाजताचा सूमारास आलेल्या या वादळी पावसामुळे गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव परिसरातील शेतपिकांना मोठा फटका बसला.धान,कापूस आणि मिरचीची पिके वादळाने जमिनीवर लोळली आहेत.काही दिवसांनी हातात येणाऱ्या पिकांचे झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे बळीराजा हादरला आहे.दरम्यान नुकसान भरपाई त्वरीत देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.